साहित्यिक युवराज नळे यांना "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाड्.मय पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल युवा साहित्य समुहाकडुन सत्कार..
प्रतिनिधी....शहाजी आगळे
धाराशिव :- मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद मुक्तिसंग्राम मधील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अधोरेखित करणारी साहित्यिक युवराज नळे यांची संशोधन पर साहित्यकृती 'मराठवाडा नव्हे,भारत मुक्तिसंग्राम' या ग्रंथास पुणे येथील मातंग साहित्य परिषद तर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी दिला जाणारा २०२५ चा मानाचा "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाड्.मय पुरस्कार" जाहीर करण्यात आला.सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा साहित्य समुहाकडुन गणेश वाघमारे,युसूफ सय्यद, बालाजी यावलकर यांच्याकडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला
0 टिप्पण्या