Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

अलीकडील पोस्ट

अधिक दर्शवा
 खामसवाडीमध्ये दलित तरुणांवर जीवघेणा हल्ला; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, आरोपी मोकाट – प्रशासनावर प्रश्नचिन्ह  धाराशिव, दि.३० – तालुक्यातील खामसवाडी (बेंबळी) येथे जातीय द्वेषातून दलित समाजातील दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दगडफेक व बेदम मारहाणीत अमर सतीश सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी अद्याप फरार असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दि. १/०५/२०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्वरित पोलीस बंदोबस्त वाढवून कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीनंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आकाश दत्ता अवधुते व अमर सोनवणे हे मोटरसायकलवरून घरी जात असताना काही गावगुंडांनी त्यांना अडवून जातीय शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी संगनमताने आकाश अवधुते यांच्या घरावर हल्ला चढवून दगडफेक केली, घरावरील पत्रे उचकटून मोठे नुकसान केले व दोघांनाही लाथाबुक्क्यांनी व दगडांनी निर्दयपणे मारहाण केली. या प्रकरणी खंडू बापू गुळवे, रंजीत सुरेश गुळवे, ओमकार बालाजी गुळवे यांच्यासह एकूण १० जणांविरोधात भा.न्या.सं. २०२३ तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक न झाल्याने पीडित कुटुंब भयभीत असून आरोपी खुलेआम धमक्या देत फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खामसवाडी परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. वेळेत कठोर कारवाई न झाल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तत्काळ आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.
रुईभर येथे भक्तीचा महोत्सव; श्री सिद्धिविनायक प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा    स्वखर्चातून मंदिर उभारणी; कीर्तन, सत्कार व महाप्रसादाने रंगणार भक्तिमय सोहळा.....
धाराशिव महसूल विभागाची क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेत दमदार कामगिरी; विविध प्रकारात यश
रुईभर–मेडसिंगा परिसरात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तात्काळ पंचनाम्याची मागणी.....
  माहिती देण्याऐवजी अर्जदारालाच कार्यालयात बोलावले; वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह”
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा विजय!
अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत