प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव मध्ये लोहपुरुष सरदारवल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त युनिटी पदयात्रा उत्साहात संपन्न.
धाराशिव, दि. 21, : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सरदार @150 एकता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
श्री.तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव मा.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेची सुरूवात करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, मेरा युवा भारत कार्यालय धाराशिव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली सदरील “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” सकाळी 10.00 वाजता श्री.तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथून सुरू होऊन मा.जिल्हाधिकारी कार्यालय - पोलिस अधीक्षक कार्यालय – कोहिनूर हॉटेल- समता नगर - सह्याद्री चौक – महात्मा फुले चौक - श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव ठिकाणी या पदयात्रेची सांगता झाली.
यावेळी मा.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यालबद्दल सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले. जिल्हा युवा अधिकारी राहूल डोंगरे यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
तसेच या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे, जिल्हा आपती व्यवस्थापन अधिकारी वृषली तेलोरे, शिक्षण अधिकारी दत्तात्रय देवगुडे, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, तालुका क्रीडा अधिकारी श्री. भैरवनाथ नाईकवाडी, क्रीडा अधिकारी श्री. अक्षय बिरादार इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनचरित्र वरील शाहिरी पथकाच्या पोवाड्याने झाली तर सांगता राष्ट्रीय एकतेवरील सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.
सदरील पदयात्रेत मेरा युवा भारत कार्यालय धाराशिव जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय,स्थानिक युवा संघटना,एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि भारत स्काऊट गाईड युनिट्स, पोलीस विभाग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मेरा युवा भारत कार्यालय (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. या अनुषंगाने ही पदयात्रा आयोजित करण्यात आली. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी वैभव लांडगे, रवि सुरवसे, प्रशांत मते, किशोर भोकरे, सुरेश कळमकर, वेंकटेश दंडे यांनी परिश्रम घेतले. सहभागीना अल्पोपहार देऊन समारोप करण्यात आला.





0 टिप्पण्या